औरंगाबाद : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र औरंगाबाद, विकास अध्ययन केंद्र मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने 'एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरणाची आवश्यकता' या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. हा परिसंवाद शनिवार दि. ९ सप्टेंबर २०१७ रोजी दुपारी ४:०० वाजता. महसूल प्रबोधिनी सभागृह, अमरप्रीत चौक, औरंगाबाद येथे होणार आहे. या परिसंवादात पत्रकार दीप्ती राऊत , राज्यप्रमुख अॅक्शन एड श्रीमती नीरजा भटनागर, स्त्री अभ्यासक श्रीमती डॉ. वृषाली किन्हाळकर या मान्यवर मंडळी मार्गदर्शन करतील. आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.

द्वारे कार्यक्रम : 
जिल्हा केंद्र - औरंगाबाद