यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने या वर्षीपासून देण्यात येणाऱ्या पहिल्या "यशस्विनी सन्मान" पुरस्कारांची घोषणा कार्याध्यक्ष खा. सुप्रियाताई सुळे यांनी घोषणा केली असून विविध क्षेत्रातील सहा कर्तृत्ववान महिलांची या पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली आहे.

हा कार्यक्रम दि २२ जून रोजी बालगंधर्व रंगमंदिर,पुणे येथे पार पडणार आहे. या कार्यक्रमास आदरणीय शरद पवार साहेब व ज्येष्ठ विचारवंत मा. डॉ. आ. ह. साळुंखे सर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. सामान्य स्त्रिया संकटांशी दोन हात करत आपले ध्येय कसे गाठतात आणि आपल्याबरोबर इतरांनाही कशा प्रगतिपथावर आणतात, हे अनुभवण्याचा हा सोहळा आहे. सन १९९४ साली जाहीर झालेल्या महिला धोरणाला यंदा २८ वर्ष पूर्ण होत आहेत, त्याचे औचित्य साधून या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्रातून सामाजिक, साहित्य, कृषी, पत्रकारिता, उद्योजकता व क्रीडा प्रशिक्षण या क्षेत्रांतून अनेक महिलांच्या कार्याचा आढावा घेतला. त्यानंतर आम्हाला "यशस्विनी" मिळाल्या आहेत.

"आम्ही आमच्या आरोग्यासाठी" या संस्थेच्या माध्यमातून आदिवासी महिलांच्या आरोग्यासाठी काम करणाऱ्या डॉ. शुभदा देशमुख (कुरखेडा, जि. गडचिरोली) यांना 'यशस्विनी सामाजिक सन्मान'.

विविध विषयांवर नाटक, मालिका यांसह चौफेर लिखाण करणाऱ्या मनस्विनी लता रवींद्र (पुणे) यांना 'यशस्विनी साहित्य सन्मान'.

महिलांना सेंद्रिय शेतीकडे वळवून शेतीमालास योग्य तो भाव मिळवून देण्याचा प्रयत्न करणाऱ्या गोदावरी डांगे (तुळजापूर, उस्मानाबाद) यांना 'यशस्विनी कृषी सन्मान'.

विविध माध्यमातून आपली पत्रकारितेची छाप समाजमनावर उमटवनाऱ्या जान्हवी प्रसाद पाटील (कोल्हापूर, सध्या ठाणे) यांना 'यशस्विनी पत्रकारिता सन्मान'.

उद्योजकता क्षेत्रात काम करणाऱ्या शीला साबळे (महाड, रायगड) यांना 'यशस्विनी उद्योजकता सन्मान'.

कबड्डी खेळाडू व आता प्रशिक्षक म्हणून काम करणाऱ्या सिमरत गायकवाड (डोंबिवली, ठाणे) यांना 'यशस्विनी क्रीडा प्रशिक्षक सन्मान'.

समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.

या सर्व पहिल्या "यशस्विनी सन्मान पुरस्कारा" च्या मानकरी ठरल्या आहेत. या सर्व यशस्विनींचे हार्दिक अभिनंदन व त्यांना पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा. त्यांचा गौरव करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.