दृष्टी

आधुनिक आणि समृद्ध समाजाच्या निर्मितीकरिता सर्व घटकांना समान संधी निर्माण करून देणे.

बोधवाक्य

विश्वासार्ह सर्वोत्तम सेवा

आमची मूल्ये

सेवाभाव, विश्वासार्हता, प्राविण्य, सर्जनशीलता, उत्तरदायित्व

संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण साहेब म्हणजे मराठी मनांचा मानबिंदू. संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, महाराष्ट्राच्या कृषी व औद्योगिक विकासाचा पाया घालणारे, महाराष्ट्रात सहकाराचे जाळे विणणारे, आणि पंचायत राज्याच्या माध्यमातून तळागाळातल्या समाजाला स्वत:कडे असणाऱ्या लोकशाही ताकदीचे भान देणारे द्रष्टे नेतृत्व म्हणजे यशवंतराव चव्हाण साहेब. देशाच्या राजकारणामध्ये जेव्हा - जेव्हा कठीण परिस्थिती उद्भवली, तेव्हा - तेव्हा संबंधित खाती सक्षमपणे सांभाळून देशाच्या स्थैर्यात महत्त्वाची भूमिका बजाविणारे आणि राष्ट्रीय राजकारणाला दिशा देणारे नेते म्हणजे चव्हाण साहेब.

चव्हाण साहेबांच्या निधनानंतर २५ नोव्हेंबर, १९८४ रोजी त्यांचे हे कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी त्यांचे अनुयायी, सुह्रद व कार्यकर्ते एकत्र आले. त्यातूनच १७ सप्टेंबर, १९८५ रोजी मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानची, (आताचे यशवंतराव चव्हाण सेंटर) स्थापना झाली.

यशवंतराव चव्हाण सेंटर हे धर्मनिरपेक्ष, पक्षनिरपेक्ष व्यासपीठ आहे. महाराष्ट्राच्या जनमानसाला सचिंत करणार्‍या प्रश्नांचा खल करावा आणि या चर्चेतून कार्य करणारी माणसे तयार व्हावीत, हीच सेंटरची भूमिका आहे. या राकट, कणखर, दगडांच्या देशाचा स्वाभिमान अभंग राहावा, ही महाराष्ट्रातील जनमानसाची इच्छा आहे. यशवंतराव चव्हाण सेंटरचा तीन दशकांचा प्रवास हा या आकांक्षेच्या पूर्ततेचा आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटर कार्यक्षेत्रे